०४ सप्टेंबर २०११

ढेकुण मारून शहीद होणे...हि मर्दुमकी नव्हे !!!


मागील १०-१५ दिवसापासून दिल्लीतील रामलीला मैदानावरच्या '' लीला '' सर्वांनीच पहिल्या.. आपल्यापैकी काहींनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याचे समर्थनही केले. मिडीयानेही त्या '' लीला '' क्याच नव्हे क्याश केल्या. आण्णा आणि टीम च्या आंदोलनाचा धुराला उडाला. राज्य घटना.. लोकशाही... संसदेला जेवढे वेठीस धरता येईल तेवढे आण्णा आणि व त्यांच्या सवंगड्यांनी धरले.... असो, अंधपणे पाठींबा देणे हा माझा स्वभाव नाही अन ते आमच्या स्वभावाला पटतही नाही. एक पत्रकार म्हणून प्रवाहाच्या विरोधात जाउन सत्यता पडताळून पाहणे कधीही चंगले. सांगण्याचा मुद्दा असा की, लोकपाल... भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचे प्रभावी हत्यार, असा समज आण्णा व त्यांच्या समर्थकांचा आहे. हरकत नाही. भ्रष्टाचाराचा थेट फटका सामान्य माणसालाच बसतो. त्यामुळे भ्रष्टाचारचे समर्थन कोणीही करणार नाही. पण, आणांच्या लोकपाल संकल्पनेत NGO' s,नाहीत. जे योजनांच्या नावाखाली करोडो रुपयांचा मलिदा लाटतात. लोकपाल च्या कक्षेतून खाजगी एन जी ओ ना वगळण्याचे कारण काय ? कि अण्णा हजारेंपासून केजरीवाल, बेदी, स्वामी अग्निवेश यांच्या एन जी ओ आहेत आणि त्यांना करोडो रुपये अनुदान आणि मदत मिळत असते म्हणून ? लोकपाल कक्षेत सरकारी अधिकारी-कर्मचारी नाहीत...(आता बोंब झाल्यावर आण्णांना हे सुचले) गावच्या ग्रामसेवकापासून ते मंत्रालयातील साचीवान्पार्यंत सामान्य मानसंची अडवणूक होते. प्रश्न काळ्या पैश्याचा ? मध्यंतरी स्विस बँकेतील भारतीयांच्या ठेविबद्दल या मंडळींनी बरीच ओरड केली... ते समर्थनीय होते. पण, आण्णा आणि मंडळींनी भारतातील धार्मिक भ्रष्टाचार किंवा तेथे श्रद्धेच्या आडून केल्या जाणाऱ्यागोरख धंद्याबद्दल मात्र चुप्पी का बरे साधली असावी ? अण्णा धार्मिक क्षेत्रातल्या भ्रष्टाचाराबद्दलही जरा बोला. भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार धार्मिक क्षेत्रात होतोय. भारतात बाबा, बापू, भैयू, साध्वी, महाराज यांच्याकडे लाखो-करोडो रुपयाची मालमत्ता आहे. पण त्याबद्दल अण्णा किंवा त्यांचे सहकारी अवाक्षरही काढत नाहीत. नुकतेच केरळ मधील पद्मनाभ मंदिरात एक लाख कोटी रुपयांची संपत्ती आढळून आली. ती संपत्ती निर्विवादपणे राष्ट्राची असताना काही महाभाग मंदिर व्यवस्थापनाचा अधिकार प्रस्थापित करू पाहत आहेत. आज अनेक बाबा लोक अण्णांच्या आंदोलनात अग्रभागी आहेत. त्यांचीही संपत्ती जाहीर झाली पाहिजे. एक नव्हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आण्णा आणि मंडळींनी त्यांची उत्तरे दिली पाहिजेत. प्रती गांधी बनून लोकांच्या भावनेशी जास्त काळ खेळणे अंगलट येऊ शकते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली या देशाची घटना आणि लोकशाही साऱ्या जगात आदर्शवत ठरली आहे. पण, आण्णा व त्यांच्या बगलबच्यांनी अप्रत्यक्षपणे राज्य घटनेलाच आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. अण्णा आणि त्यांचे सहकारी भ्रष्टाचार निर्मूलनाच्या नावाखाली घटना बदलण्याचे आणि घटनेबद्दल अपप्रचार करण्याचे षडयंत्र तर राबवत नाहीत ना अशी शंका यायला लागली आहे. न्या. बी. जी. कोळसे-पाटील म्हणतात, ''देशाचा कारभार हा भारतीय घटने प्रमाणे चालतो. तीच सर्वश्रेष्ट आहे . घटनेनुसार कायदे करायचे अधिकार फक्त पार्लमेंटला व विधानसभेला आहेत. सिविल सोसायटीला कसा कायदा असावा किंवा कायद्यात काय दुरुस्त्या असाव्यात एवढाच सांगण्याचा अधिकार आहे. मी म्हणतो तो कायदा पास करा असे दडपण, उपोषणाच्या माध्यमातून कितीही मोठ्या माणसाला आणता येत नाही. अण्णांनी त्यांचे लोकपाल बिल पार्लमेंटला दिले आहे येथेच आणांचे काम संपले आहे. त्यामुळे अण्णांनी यापुढे सतत उपोषण करून दबाव न आणणे यातच खरे हित आहे. एक ध्यानात घ्या...... ''आण्णा तुम्ही महान आहात... पण घटनेपेक्षा लहान आहात''तूर्तास एवढेच...........