१० नोव्हेंबर २०११

" निष्ठा "... रक्तातच असावी लागते !


खरं सांगू.... आम्ही विज्ञानवादी अर्थात बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर... तथागत बुद्धांचे अनुयायी असल्यामुळे ज्योतिष... शकून-अपशकून, कर्म कांडावर आमचा विश्वास नाही ; पण श्रद्धा (अंधश्रद्धा नव्हे).. निष्ठा आणि निती, या गोष्टींवर किमान मी तरी विश्वाश ठेवतो... तसे आचरणही करतो... असो. तुम्ही म्हणाल, मग आम्हाला काय त्याचे?... आहे.. त्याच्याशी तुमचाही संबंध आहे म्हणूनच तर लिहिण्याचा हा खटाटोप केलाय...

... तर सांगण्याचा मुद्दा असा आहे. (थोडे विषयांतर होईल, पण समजून घ्या.) तुम्ही ज्या समाजात जन्माला आले. ज्या संस्कृतीने तुमचे भले-बुरे सोचले.. ज्यांनी तुम्हाला किमान माणूस म्हणून ओळख दिली.. ज्यामुळे तुम्हाला माणसासारखे जगण्याचे बळ मिळाले.. त्याच्याशी आपण कितपत एकनिष्ठ आहोत? .. पशूपेक्षाही हीन जीने आमच्या वाट्याला होते... ज्या समाज व्यवस्थेने आम्हाला माणूसपण नाकारले.. जे ३६ कोटी देवही आम्हाला माणूस म्हणून स्वीकारण्याची आज्ञा देण्यास मजबूर आणि लाचार होते... तेव्हा युगानुयुगे चालले हे अन्याय मोडीत काढण्यासाठी पृथ्वीतलावर एक मसीहा अवतरला. त्याचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर... त्याने प्रस्थापित समाजव्यवस्थे विरुद्ध बंड पुकारले. (आम्हाला म्हणजे फक्त महारांना नव्हे तर तमाम मागासवर्गीयांना) माणूस म्हणून जगायचे असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा तरणोपाय नाही हा मूलमंत्र दिला. शिका-संघटीत व्हा अन आपल्या हक्कासाठी संघर्ष करा.. हा मुल मंत्र दिला.. आम्ही (फक्त पुर्वाश्रामिंच्या महारांनी आत्ताच्या बौद्धांनी) तो शिरसावान्ध्य मानला... बाबासाहेबांचे विचार आत्मसात केले.. हा समाज बाबासाहेबांना.. त्यांच्या विचारांना एकनिष्ठ राहिला... बाबासाहेबांच्या सांगण्यानुसार शिकला-सवरला... कृती केली...

नतीजा काय ? या समाजाला त्यामाध्यमातून एक नवी दिशा.. नवी उर्जा... नवी उर्मी ... नवे तेज.. एक चैतन्य.. दृष्टी आणि आत्मभान आले... परिणाम काय...? या देशात थोडे बहुत का असेनात पण मोक्याच्या पदांवर पुर्वाश्रामिंचे महार आणि आताचे बौद्ध विराजमान झाले... ते कोणाच्या मेहरबानीने नाही तर बाबासाहेबांचे उपकार आणि स्वतःच्या बुद्धीच्या बळावरच.

वाईट या गोष्टीचे वाटते की आमचे लहान भाऊ मांग, चांभार,ढोर अर्थात sc -st - obc - vjnt - सर्वच मागास प्रवर्गातील समाजांनी एक तर बाबासाहेबांना खुल्या अंतकरणाने स्वीकारले नाही... त्यांच्या विचाराशी प्रतारणा केली... त्यांनी जो सामाजोद्धाराचा मूलमंत्र दिला.. त्याची थट्टा करून हिंदू संस्कुतीचेच आम्ही वफादार आहोत, हे दर्शविण्याचा केविलवाणा आकांत केला ... आजही तोच प्रयत्न सुरु आहे... त्यामुळे हा समाज आज सर्वार्थाने पिछाडीवर राहिला...

इथे मूळ मुद्दा आला '' निष्ठा''............! बौधेत्तर समाज निष्ठावान राहिला नाही... मराठा-ब्राह्मणांचे मांडलिकत्व त्या समाजाने स्वीकारले... परिणाम~~~~~? पूर्वाश्रमीचे महार आत्ताचे बौद्ध सोडून अन्य सर्व मागासवर्गीय हे मागासवर्गीयच राहिले...पण आपला हा दोष आणि चूक आजही ते स्वीकारायला तयार नाहीत, हे त्यांचे दुर्दैव म्हणावे... उलट ज्यांनी पिढ्यानपिढ्या आपणास गुलाम म्हणून वागविले त्या प्रस्थापित समाजाला वफादार असल्याचे दर्शिवाण्यासाठी त्यांनी आपल्या मोठ्या भावंडाशी (महारांशी /बौद्ध) बेवफाईच केलेली आहे. याची कित्येक उदाहरणे देता येतील. बौद्धेत्तर किती आणि कोणता दलित समाज हा मुळात रिपब्लिकन पक्ष आपला समजतो? (अलीकडे या पक्षाचे नेते चुकले असतील पण या पूर्वी ?)

सांगायचे हे आहे की, तमाम दलितांनी जर बाबासाहेब स्वीकारले असते... त्यांच्या विचारांचे आचरण केले असते तर आजचे चित्र नक्कीच वेगळे दिसले असते...  असो, सत्य हे नेहमीच कटू असते मित्रांनो... हे आपणास कदाचित पचणार नाही.. पण प्रयोग करून पहा ... परिणाम अत्यंत सकारात्मकच येईल...

'' आमच्या घरात मूल जन्माला येते तेव्हा... अगोदर त्याला सर्वप्रथम आई आणि
दुसरा -जयभीम- हा शब्द उच्चारण्यास शिकवला जातो'' हि आहे निष्ठा आणि श्रद्धा...''









1 टिप्पणी:

SRK म्हणाले...

vijayji Jaybhim,
aapla blog vachala.lekhnachi style atyant changli aahe.vishyache vaividhya japun aankhi uttamotam lekhan vachayala milel ya apekshesah tumhala shubbheccha