१० ऑक्टोबर २०११

''महासत्ता कोणत्या गाढवीचं नाव...?''

भारत येत्या २०२० मध्ये जगाची महासत्ता होणारचं... असे कोणाच्या भाषणातील बोल ऐकले की हसायला येते.
कशाला म्हणतात महासत्ता...? महासत्ता कोणत्या गाढवीचं नाव आहे?

खरंच, महासत्ता हा शब्द मला सतत अस्वस्थ करतोय... हा देश जोपर्यंत युगप्रवर्तक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार सर्वार्थाने आत्मसात करीत नाही तोपर्यंत महासत्तेचे स्वप्नंच कुणी पाहू नये... आणि ते शक्यही होणार नाही... ही भविष्यवाणी नव्हे qकवा कोणा जोशाने सांगायचे जोतीष्य नाही.. हे वास्तव आहे...

अष्टपैलू व्यक्तिमत्व, अपार राष्ट्राभिमान आणि अथांग विद्वत्तेच्या बळावर जगभरात लौकिकास पावलेला हा महामानव मात्र स्वत:च्या देशात उपेक्षितच राहिला... हे या देशाचे दुर्दैव...! इथल्या बुरसटलेल्या मनुवादी समाजव्यवस्थेने आणि या व्यवस्थेच्या मनुवादी ठेकेदारांनी बाबासाहेबांसारख्या अलौकिक व्यक्तीमत्वालाही जेव्हा सोडले नाही तेव्हा समाजातील आमआदमीची तर काय गत असेल, याची कल्पनाही करवत नाही. असो, बाबासाहेबांनी या देशातील शोषित, वंचित, उपेक्षित, कष्टकरी सर्वहारा वर्गाला शिक्षणाचा मुलमंत्र दिला... शिक्षणाशिवाय तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचे बळ येणार नाही... शिक्षण नसल्यामुळे तुम्हाला डोळे असूनही दृष्टी नाही... पाय असूनही तुम्ही लंगडे आहात... हात असूनही तुम्ही दुबळे आहात... म्हणून तुमच्या मुलांबाळांना अगोदर शिक्षण द्या.... मग, बघा तुमच्यात आत्मबळ येईल... स्वाभिमान जागृत होईल... हा विश्वास बाबासाहेबांनी दिला... पशुपक्षांपेक्षाही हीन जिने जगत असलेल्या समाजाने बाबासाहेबांचा हा उपदेश कृतीत उतरविला... पोटाला चिमटा घेऊन मुलं शिकवली... अन् खरोखर जादूची कांडी फिरावी तसा चमत्कार घडला... शिक्षणाने या समाजाला जगण्याची दृष्टी आली... समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करण्याची उर्मी मिळाली... आम्हीही माणसं आहोत... आम्हालाही माणसारखंच जगायचयं, असे आत्मभान आले... स्वाभिमान जागृत झाला अन् क्षणात गावकी, येसकरकी, रामोशाची कामे झुगारुन दिली... आज देशात मोक्याच्या पदांवर समाजातील अनेक विद्वान मंडळी केवळ बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे विराजमान झालेली दिसून येते.. राजकारण, अर्थकारण, समाजकारण, उद्योग, व्यवसाय।, शेती अशी सारीच क्षेत्रे या समाजाने आता कवेत घेतली आहेत...

मग, काय या दुर्बल घटकाचे आता सारेच प्रश्न मिटले? अस्पृश्यता संपुष्टात आली.. अन्याय-अत्याचार बंद झाले.. गावचे संरजामदार या समाजाला मानसन्मान द्यायला लागले... पक्तींत सोबत बसतायेत म्हणून काय ते रोटी-बेटी व्यवहारास राजी व्हायला लागले...आंतरजातीय विवाहाच्या माध्यमातून या समाजाच्या शिकल्या सवरल्या मुलांनी त्यांच्या मुलींसोबत लग्न केली. करतायेत.. मग, ते जावई qकवा नातेवाईक म्हणून स्वीकार करतायेत.......साèयांचे उत्तर एकच.......नाही.!!!

आजही समाजव्यवस्था तीच आहे. पूर्वीची आणि आताची सारखीच... तिच्यात तसूभरही फरक qकवा बदल झालेला नाही. केवळ मेकअप केल्याप्रमाणे अलिकडे तिचा चेहरा बदलला आहे... अस्पृश्यतेचे स्वरुप बदलले आहे... अदृश्यस्वरुपाची अस्पृश्यता आजही या समाजाचा जीवघेणा छळ करीत आहे... मग ती प्रशासकीय अस्पृश्यता असेल.. मग ती राजकीय अस्पृश्यता असेल qकवा आर्थिक अस्पृश्यता असेल. गावात आजही ताटात जेवण करणारे संरजामदार ज्याला प्रचलीत भाषेत सवर्ण म्हणातात... ते ओठात एक अन् पोटात एक, या प्रमाणे वेगवेगळ्या पातळ्यांवर या समाजाची सतत नाकेबंदी करीत आहेत... २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावरही देशात जर अशी विसंगती असेल तर महासत्तेच्या पोकळ गप्पा कशासाठी.?

दुसरीकडे, स्वत:च्या प्रकृतीची तमा न बाळगता बाबासाहेबांनी सर्वसमावेशक अशी सुंदर लोकशाहीप्रधान राज्यघटना या देशाला अर्पण केली... काय झाले पुढे? सत्तेत बसलेल्या राजकारण्यांनी आजपर्यंत त्या राज्यघटनेची प्रामाणिकपणे अंमलबजावणी केली नाही. त्यामुळे दुबळा समाज अधिक दुबळाच राहिला.. त्याला ही समाजव्यवस्था खुलेआम दाबत राहिली... समाजाच्या उत्थानाच्या केवळ वल्गना करीत राहिले हे सत्ताधारी...

मग आता सांगा तुम्हीच हा देश कसा होईल महासत्ता..?