२४ जून २०१२

हर्सूल कारागृहाच्या सुरक्षेवरच प्रश्न



हर्सूल मध्यवर्ती कारागृहातील किस्से ऐकल्यानंतर सर्वसामान्य नागरिकांना आश्चर्य वाटले नसेल तर नवलच. जेलमध्ये असे कसे शक्य आहे हो, हा त्यांचा पहिला प्रश्न असेल अन् तो साहजिक आहे. गुन्हा केला की तुरुंगात जाऊन खडी फोडावी लागते, गुलामाप्रमाणो राबावे लागते, असाच सर्वसामान्यांचा समज असतो. मात्र, अलीकडे काही बडय़ा कैद्यांनी पैशाच्या बळावर व्हीआयपी सुविधा देण्यासाठी प्रशासनाला भाग पाडले आहे. कैद्यांचे खाण्यापिण्याचे चोचले पुरविले जातात. त्यांना अमली पदार्थाचा पुरवठा केला जातो. यातूनच तुरुंगातही भाईगिरीला ऊत आला असून, वर्चस्वाच्या इर्षेपोटी कैद्यांच्या जीवघेण्या मारामा:या होत आहेत. एकंदरीत, यानिमित्ताने हसरूल कारागृहाच्या सुरक्षेवरच आता प्रश्न निर्माण झाला आहे.
हर्सूल कारागृह हे तसे मध्यवर्ती कारागृह असल्यामुळे येथे खून, दरोडे, बलात्कार अशा गुन्ह्यांतील कैद्यांप्रमाणो मुंबई बॉम्बस्फोटातील खतरनाक आरोपी, अंडरवर्ल्डमधील काही शार्पशूटरसारखे खतरनाक कैदी ठेवण्यात आलेले आहेत. सध्या या जेलमध्ये मुंबई बॉम्बस्फोटातील सलीम कुत्ता ऊर्फ सलीम निसार शहा, परवेज कुरेशी, शेख अली खान, सरदार खान, नासेर केवट अशा खतरनाक कैद्यांची भाईगिरी चालते. सलीम कुत्ता हा या गँगचा प्रमुख असून, त्याच्या मर्जीनुसार जेलमधील कैद्यांचे व्यवस्थापन राबविण्यास प्रशासन तत्पर असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत. तुरुंग प्रशासन घाबरते म्हणून या कैद्यांना सर्व सुखसुविधा पुरविल्या जातात का? त्यांना पाहिजे त्यावेळी रजा, पाहिजे त्यावेळी दवाखाना, पाहिजे त्यावेळी मटन, अमली पदार्थ, मनोरंजनाची साधने पुरविली जातात का? नाही. तुरुंग अधिका-यांना हे कैदी अपेक्षेपेक्षा जादा पैसा पुरवितात, त्यामुळेच त्यांचे तुरुंगात लांगुलचालन केले जाते. तुरुंग अधिकारीच अशा खतरनाक कैद्यांचे चोचले पुरवीत असतील तर त्यांच्यात ‘भाईगिरी’ची गुर्मी का राहणार नाही? काही सरळमार्गी कैद्यांना कोणाचीही भाईगिरी खपत नाही. ते तुरुंग प्रशासनाच्या आदेशानुसार आपला दिनक्रम सुरू ठेवतात. तुरुंगातील अशा बेकायदेशीर कृतीला कंटाळलेले अनेक कैदी मग एखाद्या दिवशी तुरुंग प्रशासनाविरुद्ध बंड पुकारतात. अर्थात, त्यांची ही कृती समर्थनीय आहे असेही नाही. कायदा मोडण्याचा अधिकार अथवा कायद्याविरुद्ध बंड करण्याचा अधिकार कोणालाही नाही; पण हे का घडते? याचा विचार तुरुंग विभागाच्या उच्च अधिका:यांनी करायला हवा.
कारागृहातील भ्रष्ट कारभार
हर्सूल कारागृहात कैद्यांना गांजा, चरस आणि नशेच्या गोळ्या पुरवठा करणा:या अधिका:यांची चौकशी करण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते. हसरूल कारागृहात या अमली पदार्थाचा व्यवसाय झाला आहे. लाखो रुपयांची उलाढाल यामध्ये होते, असा आक्षेप याच कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगलेल्या माणिक गणपती सगर या कैद्याने याचिकेद्वारे घेतला होता. कारागृहात गांजा, चरस आणि नशेच्या गोळ्या पुरवठा करण्याचा हा एक व्यवसाय झालेला आहे. लाखो रुपयांची उलाढाल यामार्फत होते. या प्रकारामुळे तुरुंगात आत्महत्याही होत आहेत, असे माणिक सगर या कैद्याने न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले होते. त्यानुसार उपमहानिरीक्षकांनी चौकशी केली; पण पुढे काय झाले? काहीही फरक पडलेला नाही. सध्या सर्व ‘अलबेल’ असल्याचे कैद्यांचे म्हणणो आहे. यास कोणते घटक कारणीभूत आहेत, याचा शोध घेऊन त्यांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे.

तुरुंगात घडलेल्या घटना
6 मे 2008 रोजी हर्सूल कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या महादेव आसाराम सिल्लोडे या कैद्याने पोलिस निरीक्षक तथा हर्सूल कारागृहात न्याय विभागात तुरुंग अधिकारी म्हणून कार्यरत मोमीन असद अब्दुल कय्युम व किरण संतोष पवार या अधिका:यांवर तीक्ष्ण चाकूने हल्ला केला. यापूर्वीही याच कैद्याने एका तुरुंग अधिका:यावर खुनी हल्ला केला होता.
16 ऑगस्ट 2010 रोजी मानसी देशपांडे हत्या प्रकरणातील आरोपी जावेद खान ऊर्फ टिंग:या हबीब खान व त्याचे साथीदार कैदी लतिफ खान जब्बार खान, शेख अक्रम शेख नवाज, इलियास खान लतिफ खान यांनी तुरुंग हवालदार शेख अफजल शेख अमीर यांच्यावर हल्ला केला होता.
सन 2006 मध्ये शेख बशीर शेख करीम ऊर्फ मुन्ना (वय 3क्, रा. पडेगाव) हा भिंतीवरून उडी मारून हर्सूल कारागृहातून पसार झाला होता. 26 जुलै 2009 रोजी पिंटू ऊर्फ पांडुरंग चंदर सोनवणो या कैद्याने दोन नंबरच्या बराकीत फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर आता मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील खतरनाक आरोपी सलीम कुत्ता, पवन शर्मा यांनी आरटीओ कार्यालयातील लेखापाल धर्मराज कोंडावार यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी सचिन तायडेवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना ताजी आहे. या सर्व घटना बघता तुरुंगाच्या हाय सिक्युरिटी झोनमध्ये धारदार शस्त्रे कशी जातात? किंवा अशी शस्त्रे कारागृहातच तयार करणा:या कैद्यांवर प्रशासनाचा वचक आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे. एकंदरीत, या सा:या घटनांवरून हर्सूल कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.