१४ डिसेंबर २०११

अस्पृश्त्तेची दाहकता आजही तेवढीच !!!


माझ्या या ब्लॉगवर प्रसिद्ध झालेल्या ""रिपब्लिकन पक्षाची वाताहत: दोषी कोण ?"" या लेखावर अनेक मित्रांनी कमेंट दिल्या. कोणी प्रत्यक्ष ब्लॉग वाचून तर कोणी फेसबूक वरची नोट वाचून. त्याबद्दल सर्वांचे आभार..धन्यवाद..!!
तर मित्रांनो.. कमेंट बाजूनेच आल्या तर बरे वाटावे अन विरोधी आल्या तर वाईट, या मताचा मी मुळीच नाही. मला वाटते संपूर्ण मजकूर वाचूनच दिली तर त्या प्रतिक्रियेतून काही तरी आउटपूट निघते. त्याच हेतूने मी लेखन प्रपंच केला होता. 
असो, अनेकांनी रिपाई नेतेच बदमाश.. तेच दोषी.. रिपाईमध्ये अन्य जाती जमातींना सामावून घेले जात नाही.. महारांचा पक्ष केला..वैगेरे वैगेरे .. अशा विविध प्रतिक्रिया दिल्या. 
मित्रांनो... आपण बाबासाहेबांचा जीवन संघर्ष बारकाईने वाचा. ज्या बाबासाहेबांना त्यांच्या हयातीत इथल्या महारेत्तर मांग, चांभार, ढोर, बंजारा, वंजारा, माळी, साळी, तेली, कुणबी, अशा बहुजन शोषित-वंचीतांनी  नाकारले. त्यामुळे बाबासाहेबांना स्वतंत्र मजूर पक्ष, शेडूल्काष्ट फेडरेशन हे पक्ष गुंडाळावे लागले. त्यांनी मग रिपाईची संकल्पना आखली.
ज्या शोषित-वंचीतांसाठी बाबासाहेबांनी आयुष्य खर्ची घातले...  तरीही बाबासाहेबांनी मानव मुक्तीसाठी धर्मांतराची भूमिका घेतली म्हणून शोषित-वंचीतांनी बाबासाहेबांची राजकीय चळवळीत नाकारली. तरीही आपण म्हणता की आजच्या नेत्यांनी बहुजनांना include केले नाही. 
तर मित्रहो...माझ्या पुढील प्रश्नांची सद्सदविवेकबुद्धीला स्मरून उत्तरे ध्या...... अपोआप मग तुमच्या आरोपांचे खंडन होईल...
 नं -1) आजही  बाबासाहेबांचा अनुयायी म्हणून महार आजचा बौद्ध सोडला तर अन्य कोणता समाज रिपाईला आपला पक्ष मानतो..? 
नं -2) आजही  महार आजचा बौद्ध सोडला तर अन्य कोणता समाज रिपाईच्या उमेदवारांना मतदान करतो.
नं -3) रिपाईमध्ये सारा शोषित-वंचित, मागास, बहुजन, कष्टकरी, अल्पसंख्याक समाज सामावून घेण्यासाठी प्रयत्न झाले नाहीत का ?
नं -4) बाबासाहेबांनी फक्त पूर्वाश्रमीचे महार आणि आताचे बौद्ध यांच्यासाठी कार्य केलेले आहे का ?
नं -5) बाबासाहेबांनी हिंदू धर्मातील महिलांच्या अधिकारासाठी संसदेत हिंदुकोड बिलासाठी आग्रह धरला. तेव्हा ते बिल हिंदू खासदार आणि तत्कालीन कॉंग्रेस सरकारने उधळून लावले. त्यामुळे बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देऊन ते संसदेबाहेर निघून गेले... हा त्याग किती हिंदू महिला जाणतात. आज किती हिंदू महिला बाबासाहेबांना साधे वंदन तरी करतात ? 
नं -6) मंडल आयोगाचा लढा कोणी लढला ?
नं -7)  मंडल आयोगाचा लढा रिपाई नेत्यांनी अन कार्यकर्त्यांनी प्राणपणाने लढला. अनेक आंबेडकरी कार्यकर्ते त्या लढ्यात शहीद झाले, हे ठाऊक आहे का?
नं -7) पदरात लाभ पडल्यानंतर आता मंडल आयोगाचे गोडवे गाणा-या बहुजानांनीच (ओबिसिंनीच) तेव्हा सुरुवातीला मंडलला विरोध केला होता. हे आपणास ज्ञात आहे का?
बोलणे... कोणाला शिव्या देणे.. कोणाला कमी लेखणे फार सोपे असते...   
असो, 
या सर्व गोष्टी केवळ आणि केवळ जातिवाद.. महारांच्या प्रगतीप्रती मनात असलेली खदखद ..  द्वेष... यामुळे घडताहेत मित्रांनो.   
आजही महाराष्ट्रात आरक्षित जागा मग त्या राजकीय पटलावर निवडणुकांच्या असो की नोकरीच्या.. त्यासाठी प्रस्थापितांना  महार वगळून सारे चालतात..... अस्पृश्यता दृश्य स्वरुपात नाही ती अदृश्य स्वरुपात तीव्रतेने जाणवते... सामाजिक, राजकीय, आर्थिक, प्रशासकीय एवढेच काय तर प्रसार माध्यमामध्ये सुद्धा  अस्पृश्यतेची दाहकता सहन करण्या पलीकडची आहे. 
तूर्तास एवढे पुरे........  

३ टिप्पण्या:

Nitin म्हणाले...

छान विश्लेशन आहे.

hasan inamdar म्हणाले...

he sarva barobar aahe fakat nivadun yene mate milwane mhanje chalwal nahi babasahebanna padnyasathi kiti praytna zale pan babasaheb rajkiy va samajik patliwar sarkhech kryarat hote ajche nete rajkiy andolana vyatirikt samajik bandhilkitun kadhi garib mulansathi coaching class,mofat arogya tapasani,samudaik vivah,aase upkram rabwatat ka?

vijay म्हणाले...

hasan he tar chalvaliche durbhagy